संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. हेच नाही तर राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा सल्ला देत मंत्र्यांना इतिहासाचे धडे देण्यास सांगितले आहे. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका करताना संजय राऊत हे दिसले आहेत.नुकताच संजय राऊत हे सरकारवर टीका करताना दिसले. संजय राऊत म्हणाले की, धनगर समाज बकरी, मेंढी आणि शेळ्यांना आपल्या मुलांप्रमाणे जपतो. गाईचं शेण खावं हे सावरकरांच्या हिंदुत्वात बसत नव्हते. भारताच्या सैन्यात मुस्लीम सैनिक आहेत. भारताच्या पोलिस दलात देखील मुस्लीम आहेत. aभारताच्या संरक्षण दलात प्रदीप कुरुलकर पण आहेत ना?. त्यामुळे अशी जी लोक भूमिका मांडतात ना…त्यांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे. कश्मीरमध्ये शहीद होणारे जास्तीत जास्त पोलिस हे मुस्लीम आहेत, जे अतिरेक्यांशी लढतायंत.
महाराष्ट्रात असतील युद्धभूमीत असतील. मुस्लीम सैनिकांनी प्राणाचे बलिदान देऊन देशाच संरक्षण केले आहे. हा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही. काही लोकांना डबक्यातच राहायचे आणि डराव डराव कराचय हिंदुत्वाच्या नावाने. या राज्याची आणि देशाची जनता शाहनी आहे. इतिहास समजून घ्या आणि मगच त्याच्यावर बोला. फडणवीसांनी मंत्र्यांना इतिहासाची धडे द्यावीत, असाही थेट सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. थेट नितेश राणे यांच्यावरच निशाणा राऊतांनी साधला आहे. राऊत पुढे म्हणाले, या देशात हिंदू मुस्लीम दंगली घडवण्याचा काहींचा कट आहे.