तालुक्यातील प्रत्येक बँकेत केवायसी कक्ष सुरूकरा .. मनसे

जामनेर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानी पोटी शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान मंजूर करण्यात आले आहे तालुक्यातील ९९६१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मात्र ११५९ शेतकरी बांधव यांनी अद्याप बँक खात्यात केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे त्यांची अनुदानाची रक्कम परत जाऊ शकते.

त्याकरिता तालुक्यातील सर्व बँकांमध्ये तातडीने केवायसी कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येत आहे.

दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी व केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी व तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान परत जाणार नाही याची दखल घ्यावी ही विनंती ..

 

मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी निवेदन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *