धामोडी गावातील नाल्याकाठच्या भागाचे पुनर्वसन करावे.

धामोडी गावातील नाल्याकाठच्या भागाचे पुनर्वसन करावे.रावेर ता.प्रतिनिधी :-प्रदीप महाराजधामोडी येथील रहिवासी दुर्गादास प्रभाकर पाटील रावेर तालुका सरचिणीस भाजपा यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे.धामोडी गावातील नाल्याकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते घरामध्ये पाणी शिरते नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे या नाल्या काठच्या भागाचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस दुर्गादास प्रभाकर पाटील यांनी केली आहे.दुर्गादास प्रभाकर पाटील यांनी केद्रीय मंत्री  रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  नंदकिशोर महाजन यांच्या कडे धामोडी गावाचे नाल्या काठचे घरांचे पुनर्वसनचा विषय मांडला व दुर्गादास पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले. त्यांच्या या मागणीला यश मिळताना दिसत आहे. आणि धामोडी गावाचे पुनर्वसन चौकशी लवकरच होण्याच्या मार्गावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *